सोमवार, १८ ऑगस्ट, २००८

'एखादी संध्याकाळ'..


कधी कधी एखादी सुरेखशी संध्याकाळ येते.. किम्बहूना , घटना अशा घडत जातात की ती कातर वेळ कायमची स्मरणात राहते.. एखाद्या सुट्टीच्या दिवशी दुपारची 'वामकुक्षी आटोपून'.. सोप्या शब्दात 'मस्त पैकी झोपून ' उठावं .. तोंड धुऊन चेहरा ताजातवाना करावा... शरीर तर विश्रांतीमुळे फ्रेश असतंच. मग चहा प्यायला एखाद्या छोट्या होटेल मधे किंवा टपरीत जावं.. तिथून रमतगमत परत येताना मित्रांचं टोळकं भेटावं... rather एखादा भेटला तरी पुरे असतं.. कसे कोण जाणे बाकीचे आपोआप जमतात!! तिथल्याच एखाद्या कट्ट्यावर बसून किंवा उभ्याउभ्याच गप्पा सुरू कराव्यात...


संध्याकाळ ते कातरवेळ अन् कातरवेळ ते रात्र असा निसर्गाचा नि:शब्द प्रवास शरीराच्या रोमारोमांत साठवायचा, अविचलपणे अनुभवायचा !!


मग वाटतं.... आपल्यासारखे भाग्यवान आपणच! खरंच असे क्षण रोज रोज नाही येत आपल्या वाट्याला.. कधी नकळतपणे अचानक असं सगळ घडतं अन् आपण उत्साहाच्या वर्षावात चिंब भिजतो.. दुसरया दिवसाला नव्या जोमानं सामोरं जायची प्रेरणा देते अशी 'एखादी संध्याकाळ'..
भविष्य आपल्याला काय देणारंय हे ठाऊक नसतं तेच बरं.. नाहीतर मग हे असे अचानक आनंद देणारे क्षण; तेवढे इफेक्टिव नसते राहिले.. नाही का ?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

वाचकहो.. प्रतिक्रियांचं स्वागत आहे.. आपलं कौतुक किंवा टीका नवीन आणि अजून चांगलं लिहायची उमेद देतात..
आणि हो.. प्रतिक्रिया देताना कृपया आपले नाव लिहायला विसरू नका. अन्यथा ते ‘Anonymous’ असं येईल. धन्यवाद!